औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामांतरास केंद्र सरकारची मंजुरी -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट

चालू घडामोडी देश/विदेश मुंबई राजकीय
Share now
Advertisement

लोकहित न्यूज. मुंबई दि 24/02/2023

आता औरंगाबाद नव्हे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबाद नाही तर धाराशिव म्हणायचे -केंद्र सरकारची मंजुरी.

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सराकरची मंजुरी मिळाली आहे. यापुढे आता औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’, असेही फडणवीस यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *